प्रधानमंत्री शहरी आवास योजनेतील शेवटचा हप्ता मिळावा l गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाचे पंतप्रधानांना निवेदन l खामगाव प्रतिनिधी:

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 खामगाव नगरपालिकेच्या अंतर्गत प्रधानमंत्री शहरी आवास योजनेतील शेवटचा हप्ता मिळावा या मागणीसाठी गणेशभाऊ चौकसे मित्र मंडळाच्या वतीने  यांनी देशाचे पंतप्रधान यांना २ डिसेंबर रोजी निवेदन पाठविण्यात आले आहे.  सदर निवेदनात नमूद केले आहे की,खामगाव नगरपालिकेच्या अंतर्गत शहरातील विविध विभागातील गरीब मजूर व कामगारांना प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत घरांचे वाटप करण्यात आले आहे.  यानुसार डीपीआरच्या माध्यमातून शहरातील एकूण १०८ व १७२ अशा २८० लाभार्थ्यांनी या योजनेंतर्गत कर्ज घेऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या घरकुलाचे काम पूर्ण केले आहे. मात्र वर्षभरानंतरही लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून अद्याप अंतिम हप्ता मिळालेला नाही.  त्यामुळे प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  स्थानिक पालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही त्यांच्या वतीने कोणतीही कार्यवाही केली जात नाही.  खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी आपल्या मनमानी पद्धतीने कारभार चालवत आहेत. थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांना हप्ता मिळत असल्याने  लाभार्थ्यांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.  प्रधानमंत्री आवास योजना ही अतिशय चांगली योजना आहे. मात्र हप्ते न भरल्याने या योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण होत आहे.
 त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर लाभार्थ्यांचा शेवटचा हप्ता तातडीने भरण्याचे आदेश संबंधित केंद्र व राज्यांना द्यावेत असेही निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदन गणेशभाऊ चौकशी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश चौकसे यांच्या सहिने पाठविण्यात आले आहे. सदर निवेदनाच्या प्रती केंद्रीय शहरी विकास मंत्री, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.l. फोटो - गणेशभाऊ चौकसे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)